भारत आणि पाकिस्तान जुळी भावंडं. एकाच उदरातून एकाच वेळई जन्मलेली. एकाच मुशित घडलेली. एकसारखी दिसणारी, एकसारखी वागणारी, एकसारखा विचार करणारी, एकसारखॆ भाव असणारी. त्यांच्यात फ़रक करण कठीण असतं, त्याम्चा त्यांनाही. अगदी जमिनीवर सीमा काधण्यासारख्या साध्या गोष्टीतदेखील त्यांना धड फ़रक करता आलेला नाही. दोन्ही देशांमधली अर्धी सीमाच ते नीट आखू शकले आहेत.
ही दोन्मोही भावंड मोठी होता होता त्यांच्या दिशेत एका अंशाच्या एका शतांशाचा फ़रक पडला आणि पुढे जाऊन त्यांचे मार्ग
कितितरी वेगळे दिसायला लागले.
श्रद्धा आणि अंधश्राद्धा या जुळ्य़ा बहिणींबाबत हे तंतोतंत लागू होतं. मुलींमधल्या भारत पाकिस्तान. इतकं साम्य की एकीच्या ऐवजी दुसरीशी कधी बोलायला लागलो कळतं नाही. बोलता बोलता या पायावरून त्या पायावर (स्वतःच्याच) जोर दिला तरी लगेच एकीऐवजी दुसरीशी बोलण सुरू होतं इतक्या त्या जवळ जवळ असतात.
अंधश्रद्धेमधले दुर्गूण, दुर्भाव, दुर्हेतू निवडून काढून टाकून तिचं शिद्धीकरण करण्याचे प्रेयत्न शतकानुशतकं चालू आहेत पण त्याला यश आलेलं नाही. थोडी अनुकंपा, थोडी सहृदयता, थोडं प्रेम, थोडी शाश्वती मात्र खूप काही करून जातं असा मात्र अनुभव आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...

-
A lover deeply in love said to beloved, "Oh, my dear, I can't live without you". The beloved deeply in love too, replied, ...
-
दर बार कोसांवर भाषा बदलते म्हणतात. भाषा ही नदी सारखीच असते एखाद्या. इथे अशी दिसते, तिथे तशी दिसते, इथे अशी वाटते, तिथे तशी . . . . पण आजकाल...
-
• Truth is transient. • Truth is like a ball. How it looks depends upon from where you see and how you see. • If truth is that elephant the...
No comments:
Post a Comment