कितीही केला यत्न तरी
सल काही निघत नाही
रंग गेला उडून तरी
पीळ काही सुटत नाही
सूर सगळे लागले तरी
बेसूरी आतली जात नाही
माझ्या असूरी भावांची
सुरसूरी जात नाही
निवांत शांत जंगलात
वणवा कुणी पेटवल्यावर
जंगल बेचिराख झालं तरी
जमिनीची धुमस जात नाही
आलं मळभ निघून गेलं
आकाश मोकळं स्वच्छ झालं
एक इवला मेघ मात्र
पाठ नभाची सोडत नाही
एकदा आलेला राग
पूर्ण कधी शमत नाही
कितीही केला यत्न तरी
सल काही निघत नाही
Thursday, January 8, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...

-
Privacy A few years ago there were huge debates world over about net neutrality. It was about whether service providers, search engine...
-
१६ - ५ - २०१२ लिहीत असतो मी कविता , कथा , दीर्घकथा शब्द असंख्य बोलत असतो वाचाळ गप्पा , भाषणं , संभाषणं वेळी अवेळी निरर्थक शब्...
-
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
1 comment:
मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रह्स्य कोणाला कधी कळणार नाही..
Post a Comment