Tuesday, August 4, 2009

मर्ढेकरांची कविता

शिशिरागम

शिशिरर्तुच्या पुनरागमे,
एकेक पान गळावया
का लागता मज येतसे
न कळे उगाच रडावया.
पानात जी निजली इथे
इवलीं सुकोमल पाखरे,
जातील सांग अता कुठे?
निष्पर्ण झाडिंत कांपरे!


अब्द अब्द

किती पायी लागूं तुझ्या
किती आठवूं गा तूंते;
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनी येते.
.
.
कधी लागेल गा नख
तुझें माझिया गळ्याला,
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला !

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...