आपण दुःखाच्या लगोऱ्या जमवत राहून त्यांची एक भिंतच बांधतो, आपल्या ्चारही बाजूंनी. आणि दुःखाच्या त्या दगडांमध्ये लिंपायला आपण आपले आनंद वापरून घालवून बसतो. कदा्चित हे नैसर्गिकही असेल. कारणं काहीही असोत पण होते ते असे आणि आपण ते बदलू शकतो. दुःखाचे दगड, दुःखाच्या रेषा विरघळवून, पुसून टाकायच्या. आनंदाचे कण जमवत जमवत त्यांचे एक सुन्दर वाळूचे पेटिंग करायचे.
थेंबे थेंबे तळे साचते. हे तळे गटाराच्या पाण्याने भरलेले दुर्वासी असावे कि निळेशार सुंदर असावे ते आपल्याच हातात असते. हे तळे स्वछ निळे हलते खेळते ठेवा आणि बघा मग किती सुन्दर सुन्दर पक्षी, मासे आपल्या मनाभोवती उडतात, आपल्या मनाला गोड लुचतात ते.
No comments:
Post a Comment